Tuesday 31 January 2017

फुटका आरसा अन तुटका कंगवा


----------------------------------------------

ज्यांचं ज्यांचं वय आज
पन्नाशीत आहे,
त्यांच्या स्वभावामधे
बराच संयम आहे.

कुठून आला हा संयम,
एवढी नम्रता कशी ?
अपमान पचवण्याची
ताकद आली कशी ?

या प्रश्नांची उत्तरं
जरूर तुम्हाला मिळतील,
जर तुम्हाला बालपणीचे
त्यांचे दिवस कळतील.

दारिद्र्य आणि गरीबी
घरोघरी होती,
अंग घासायला दगड
अन दाताला राखुंडी होती.

कशाचं बॉडी लोशन
अन् कसचं Hair Gel,
हिवाळ्यात अंग उललं की
आमसुलाचं तेल.

तोंड पाहण्यासाठी नेहमी
फुटका आरसा असायचा
इतकुश्याच तुकड्यामधे
एकतर फक्त डोळा ,नाहीतर कान दिसायचा.

सगळे दात असलेला कंगवा
कधीही मिळाला नाही,
अफगाण स्नोचा भाव आम्हाला
कधीच कळला नाही.

चड्डी अन् सदऱ्याला
तांब्याची इस्त्री असायची,
न्याहारीला लोणच्यासोबत
शिळी भाकरी मिळायची.

कबड्डी , लंगडी , कोया
फ़ुकटे खेळ असायचे,
दोन्ही घुडगे फुटले तरी
पोरगे खूश दिसायचे.

कांद्याचे पोहे अन्
मुरमुऱ्याचा चिवडा,
पेढ्याचा तुकडा मिळाला की
आनंद आभाळाएवढा.

काजू , बदाम यांच्याबद्दल
फक्त ऐकून होतो,
एखादा पाहुणा आला की
अंगणात नाचत होतो.

मोठ्या माणसांसमोर जायची
हिंमतच नसायची,
वडील बैठकीत असले की
पोरं ओसरीवर दिसायची.

आजकालच्या पोरांना हे
खरं वाटणार नाही,
आई वडिलांच्या गरीबीवर
विश्वास बसणार नाही.

म्हणून म्हणतो पोरांनो
आई वडिलांशी बोला,
काही नाही मिळालं तरी
आनंदाने डोला.

नसण्यातच मजा होती
मोठं झाल्यावर कळतं,
खरं शिक्षण माणसाला
गरीबीकडूनच मिळतं.

Monday 23 January 2017

नील आर्मस्ट्राँग

नील आर्मस्ट्राँग ...., चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव
.
पण तुम्हा ठाऊक आहे , NASA च्या नियोजित कार्यक्रमात चंद्रावर पहिले पाऊल कोण ठेवणार होतं? अनेकांना हे ठाऊक नाही .... मला ही माहीत नव्हतं !!
.
ती नियोजित व्यक्ति होती, एडविन सी अल्डारिन, अपोलो मिशन चा पायलट ... तो अमेरिकन एअरफोर्स मध्ये कार्यरत होता, त्याला स्पेस वाॅकिंगचा अनुभव पण होता आणि म्हणुनच त्याची या मिशनचा पायलट म्हणुन निवड झालेली होती.
.
नील आर्मस्ट्राँग हा अमेरिकन नेव्हीमध्ये कार्यरत होता.... त्याची या मिशनचा
को-पायलट म्हणुन निवड झालेली होती.
.
जेव्हा अपोलो यान चंद्रावर उतरले, त्यांना नासाच्या बेस स्टेशन कंट्रोल मधुन आदेश मिळाला , "Pilot First".
.
पण एडविन थबकला,
.
"काय होईल पुढे ",
"मी उतरल्या बरोबर चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाने ओढला जाऊन चंद्रभूमीत गडप तर नाही ना होणार, किंवा बाहेर पडल्या बरोबर जळुन राख ही होऊ शकेल आपली वगैरे वगैरे....."
हा संशयाचा, अडखळण्याचा काळ काही तासांचा नव्हे तर काही क्षणांचा ...
.
मधल्या काळात NASA ने पुढचा संदेश दिला, "Co-Pilot Next".
.
क्षणार्धात नील आर्मस्ट्राँग ने आपले पाऊल चान्द्रभूमीवर ठेवले ...!! आणि तो चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव झाला ...!!
.
मानवाच्या विकासाच्या इतिहासाच्या गौरवगाथेचा एक भाग झाला...!!
.
हा जागतिक इतिहास बदलला एका क्षणात ....
एडविन कडे जरी गुणवत्ता होती... त्याने विशेष नैपुण्य प्राप्त केले असल्यानेच त्याची प्राधान्यक्रमावर निवड झालेली होती ....,
परंतू क्षणभर अडखळल्याने, तो त्या इतिहासाचा भाग होऊ शकला नाही ...!!
.
जग फक्त त्यालाच ओळखतं ज्यानं प्रथम धाडस केलं ....
.
हे एक उत्तम उदाहरण आहे, माणुस भितीने, संकोचाने, करु का नको या विचारात संधी कशी गमावतो याचं ....
.
जेव्हा जेव्हा तुम्ही चंद्राकडे बघाल, तेव्हा हे आठवा ...
क्षणभर अडखळणं आपल्याला एका दैदीप्यमान विजयाचा, इतिहासाचा भाग होण्यापासुन दूर ठेऊ शकतं...!!
.
आपल्या सर्वांमध्ये काही ना काही उत्तमोत्तम गुणवत्ता आहे, प्रश्न आहे तो फक्त क्षणभर अडखळण्याचा ... घाबरण्याचा ... संकोचाचा ... लाजाळुपणाचा ... तेच आपल्याला अनेकदा त्या यशप्राप्ती पासुन दूर ठेवतं जे मिळविण्यास आपण पात्र असतो ...!!

Salute to Indian Army


माझ्या शहिद जवानांना ही १ कविता अर्पण.....

बघ ना आई वेळ आज कशी वैरीन झालीय...
तुझी भेट न घेताच माझी जाण्याची वेळ आलीय...

घायाळ जरी झालो तरी 
अजूनसुद्धा लढतो आहे
आई...इंच इंच जखमा छातीवर घेऊन
पत्र शेवटचं लिहतो आहे,
पत्र शेवटचं लिहतो आहे...

लहानपणीच्या सर्वच गोष्टी आई
जशाच्या तश्या आठवतात
या बर्फ़ावरती माझ्या डोळ्यातली
आसवंसुद्धा गोठवतात
खुपदा वाटतं आई तुझ्या
कुशीत येऊन निजावं
तुझ्या प्रेमाच्या वर्षावात
पुन्हा एकदा भिजावं
पण मला ठाऊक आहे,
असं आता होणार नाही
आली वेळ मला सोडून,
रित्या हाती जाणार नाही
आपलं घर आठवून आई,
एकटाच रडतो आहे
रडता, रडता आई पत्र शेवटचं लिहतो आहे...

तुमच्यासाठी बाबा...
बरंच काही करायचं होतं
तुमच्या खांद्यावरच ओझं थोडं
माझ्या खांद्यावर घ्यायचं होतं
पहा ना बाबा !
दैवानं आपला कसा घात केला
माझ्या प्रेताचा भार सुद्धा
तुमच्याच खांद्यावरती दिला
तुमच्यासाठी काही करू शकलो नाही म्हणून...
मारणाआधीच मारतो आहे
मरता... मारता बाबा पत्र शेवटचं लिहतो आहे..

तुझ्या सगळ्या आठवणी भैय्या
मनात घर करून बसल्या आहेत
आत्ताच... चार दोन गोळ्या
उजव्या दंडात घुसल्या आहेत
उजव्या दंडात गोळी घुसताच
तुझी आठवण हेलावून गेली
मी तुझा उजवा हात आहे
असं म्हणायची वेळही आता सरून गेली
आपल्या छोट्या छकुलीची
काळजी तू घेत जा
माझ्या वाटणीची राखिसुद्धा
तूच आता बांधत जा...
आपल्या तिघांचा लहानपणीचा फोटो पाहून
एकटाच झुरतो आहे
झुरता, झुरता भैय्या पत्र शेवटचं लिहतो आहे...

रक्षाबंधनाला बांधलेला राखीचा धागा
छकुली अजून हातात आहे
यावेळची ओवाळणीही दिली नव्हती
हे ही माझ्या ध्यानात आहे
तूच सांग छकुली आता
तुला ओवाळणी काय देऊ
इथून निघून गेल्यावरती
रक्षाबंधनाला कसा येऊ
ज्या हातात राखीचा धागा आहे
त्याच हाताने लिहतो आहे
तुला आठवता आठवता
छकुली पत्र शेवटचं लिहतो आहे...

माझ्यामुळे सखे तुझं
आयुष्यच आता विराण होणार आहे
माझ्यासोबत मी तुझं
सर्वस्वच नेणार आहे
आपल्या दोन चिमण्यांना
माझा शेवटचा पापा दे
त्यांच्या डोक्यावर तुझा हात ठेवून
माझा शेवटचा आशीर्वाद दे
बघ ना सखे वेळ कशी
सर्रर्रर्...कण निघून जात आहे
काळोख माझ्या डोळ्यासमोर
थैमान घालत आहे...

आई...आई...आई ...
पुन्हा चार दोन गोळ्या
काळजामध्ये लागल्या आहेत
तश्या तुझ्या सगळ्याच आठवणी
पुन्हा मनामध्ये जागल्या आहेत
माझ्या डोळ्यासमोर आई
काळोख दाटून येतो आहे
ईच्छा नसतानाही
तुझा शेवटचा निरोप घेतो आहे

आई जमलंच तर पुन्हा मी
जीवन होऊन येणार आहे
अन त्यावेळीसुद्धा फक्त
तुझ्याच उदरी
जन्म घेणार आहे
आई तू रडू नकोस,
तुझ्या उसाश्याचा आवाज कानी येतो आहे
आवाज ऐकता, ऐकता... लढता , लढता... झुरता, झुरता... मरता, मरता पत्र शेवटचं लिहतो आहे
पत्र शेवटचं लिहतो आहे.
                                                          -  ARMY

Sunday 22 January 2017

Nice thought by Swami Vivekananda

- नशिबाने दिलेल्या पदाचा गैरवापर करू नका.  कोणाचा  अपमान करू नका आणि कोणाला कमीही लेखू नका.
- तुम्ही खूप शक्तिशाली असाल,
पण वेळ ही तुमच्यापेक्षाही शक्तिशाली आहे.
- कोणी कितीही महान झाला असेल, पण निसर्ग कोणाला कधीच लायकीपेक्षा महान बनण्याचा क्षण देत नाही.
- स्वतःवर कधीही अहंकार करू नका, देवाने तुमच्या-माझ्या सारख्या किती जणांना मातीतून घडवलं आणि मातीतच घातलं.

         *_-स्वामी विवेकानंद_*

Thursday 19 January 2017

Swami Vivekananda

जी माणसं ध्येयाकडे नजर ठेवून
वाटचाल करत असतात,
ती सतत "धडपडत" असतात....
लोकांच्या दृष्टिने ती "धड" नसतात, कारण ती "पड़त" असतात. पण, खर म्हणजे ती " पड़त" नसतात. तर, पड़ता पड़ता "घडत" असतात..
             *- स्वामी विवेकानंद.*

Wednesday 18 January 2017

शरीर स्वस्थ व आरोग्यदायी राहण्यासाठी

(१) ९०% आजार हे पोटातून होतात, पोटात अॅसिडीटी, कब्ज नसला पाहिजे, पोट स्वच्छ, साफ तो आरोग्याचा राजा.

(२) शरीरात न धरता येणारे १३ वेग आहेत. याचा विचार करा.

(३) १६० प्रकारचे रोग फक्त मांसाहाराने होतात हे लक्षात ठेवा.

(४) ८० प्रकारचे आजार नुसत्या चहा पिण्याने होतात. हा आपल्याला इंग्रजांनी दिलेला विषारी डोस आहे.

(५) ४८ प्रकाचे रोग ऎल्युनियम भांडी वापरल्याने होतात.त्यात आपण ही भांडी सर्रास वापरतो. ही भांडी ब्रिटिशांनी आपल्या कैदी लोकांना त्रास होवा म्हणून वापरत.

(६) तसेच दारू, कोल्ड्रिंक, चहा याच्या अति सेवनाने हदय रोग होऊ शकतो.

(७) मॅगिनॉट, गुटका, सारी, डुक्कराचे मांस, पिज्जा, बर्गर, बिडी, सिगारेट, पेप्सी, कोक यामुळे मोठे आतडे सडते.

(८) जेवण झाल्यावर लगेच स्नान करु नये यामुळे पाचनशक्ती मंद होते, शरीर कमजोर होते.

(९) केस रंगवू नका, हेअर कलरने डोळ्यास त्रास होतो, कमी दिसू लागते.

(१०) गरम पाण्याने स्नान करण्याने शरीराची प्रतिकार शक्ती कमी होते. गरम पाणी कधीही डोक्यावरुन घेऊ नये डोळे कमजोर होतात.

(११) स्नान करताना कधीही पटकण डोक्यावरून पाणी घेऊ नका कारण पॅरालिसिसचा, हदयाचा अॅटक येऊ शकतो. प्रथम पायावर, गुडघ्यावर, मांडीवर, पोटावर, छातीवर, खांद्यावर, पाणी टाकत चोळत पहिल्यांदा स्नान करावे नंतर डोक्यावर पाणी घ्यावे त्यामुळे डोक्यातून रक्तसंचार पाया कडे होता व त्रास होत नाही, चक्कर येत नाही.

(१२) उभ्याने कधीही पाणी पिऊ नये टाच कायमची दुखु लागते.

(१३) जेवताना वरुन कधीही मीठ घेऊ नये त्यामुळे चक्तचाप, ब्लडप्रेशर वाढतो.

(१४) कधीही जोराने शिंकू नये नाहीतर कानाला त्रास होऊ शकतो.

(१५) रोज सकाळी तुळशीचे पाने खावीत कधीच सर्दी, ताप, मलेरिया होणार नाही

(१६) जेवणानंतर रोज जुना गुळ आणि सौफ खावी पचन चांगले होते व अॅसिडिटी होत नाही.

(१७) सतत कफ होत असेल तर नेहमी मुलहठी चोळावी कफ बाहेर पडतो व आवाज चांगला होतो.

(१८) नेहमी पाणी ताजे प्यावे,विहीरीचे पाणी फार चांगले, बाटलीबंद फ्रिज मधले पाणी कधीही पिऊ नये यामुळे नसानसांत त्रास होतो.

(१९) पाण्याने होणारे रोग यकृत, टायफॉइड, शस्त्र, पोटाचे रोग या पासून लिंबू आपल्याला वाचवते.

(२०) गहूचा चीक, गहूचे कोंब खाण्याने शरीराची प्रतिकार शक्ती वाढते.

(२२) स्वैयपाक झाल्यावर ४८ मिनिटाच्या आत खावा नाहीतर त्यातील पोषक तत्वे नाहीशी होतात.

(२३) मातीच्या भांडयात स्वैयपाक केल्यास १००% पोषक, काशाच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ९७%  पोषक, पिताळाच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ९३% पोषक, अल्युमिनियमच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ७ ते १३% पोषक असते

(२४) गव्हाचे पीठ १५ दिवस जुने झालेले वापरू नये.

(२५) १४ वर्षाच्या खालील मुलांना मैदयाचे पदार्थ बिस्किटं, सामोसा व इतर पदार्थ खावू घालू नये.

(२६) खाण्यास सैंधा मीठ सर्वश्रेष्ठ त्यानंतर काळेमीठ व नंतर पांढरे मीठ पण हे मीठ फार विषारी असते.

(२७) भाजलेल्या ठीकाणी बटाट्याचा रस, हळद, मध, घृतकुमारी, यातील काही लावले तर थंड वाटते व व्रण पडत नाही

(२८) पायाचा अंगठा सरसूच्या तेलाने चोळल्यास डोळ्याची आग, खाज, लाली बरी होते.

(२९) खाण्याचा चुना ७० प्रकारचे रोग बरे करतो.

(३०) कुत्रा चावल्यास तेथे लगेच हळद लावा.

(३१) लिंबू, सरशी तेल, हळद, मीठ एकत्र करुन दात घासल्यास दात स्वच्छ व सफेद होतात, व सर्व दाताचे आजार बरे होतात. डोळ्याचा आजार जेव्हा असेल तेव्हा दात घासू नये.

(३२) फार जागरण केल्याने शरीराची प्रतिकार शक्ती कमजोर होते. पचनक्रिया बिघडते व डोळ्यांचे रोग होतात.

(३३) सकाळचे भोजन राजकुमारा सारखे तर दुपारचे भोजन राजा सारखे आणि रात्रीचे भोजन भिकारयासारखे असते व असावे.

किडनी साफ करा फक्त ५/- रूपया मध्ये

                   उपाय

     कोथींबीर  घ्या बारीक चिरुन घ्या.  पाणी उकळून त्यात कोथींबीर टाका गॅस बंद करून झाकण ठेवा (५ मिनीट),नंतर गाळून घ्या आणि रोज १ग्लास ठीक १५दिवस पीत रहा लघवीने बारीक बारीक कण निघता निघता पुर्ण बाहेर निघून किडनी पुर्ण पणे साफ होईल.
     
==================

Try try but do not cry

Tuesday 17 January 2017

GATI means Get All Type of Information.The motive of this blog is provide inspirational stories, fact stories of day to day life, Cricket informations,etc.